महिलांवर असणाऱ्या विविध जबाबदाऱ्यांमुळे त्या स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे आरोग्य-संबंधित अनेक व्याधीही होण्यास सुरुवात होते. मात्र, त्याकडंही पुरेशा प्रमाणात लक्ष दिलं जात नाही. यामध्ये जागरूकता नसणं, उशिरा निदान होणं किंवा आजाराचं चुकीचं निदान या गोष्टींचा समावेश आहे. यामुळे महिलांचे आरोग्य धोक्यात येतं. त्यामुळे स्त्रियांना आपल्या आरोग्याकडे लक्ष देणे अत्यावश्यक बनले आहे. त्यामुळे महिलांनी खालील लक्षणे अथवा आजार दिसल्यास त्वरित स्त्रीरोग तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे
♦️ओटीपोटीच्या वेदना
♦️अनियमित मासिक पाळी
♦️वेदना दायक लघवी
♦️मासिक पाळीच्या विकृती
♦️कुटुंब नियोजन समस्या
♦️रजोनिवृती
♦️संभोग दरम्यान वेदना
♦️स्तंनातील गाठी व इतर समस्या
♦️असामान्य गंध वा स्त्राव
♦️थायरॉइडची समस्या